Ad will apear here
Next
घार हिंडते आकाशी
एखाद्या बाईला तिळे झाले, तर ‘कसे सांभाळता हो तुम्ही,’ असा प्रश्न अनेकांच्या तोंडी येतो. याचा सामना करीतच शेफाली वैद्य यांनी अनन्या, अर्जुन आणि आदित्य या त्रिमूर्तींच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. या तिळ्यांच्या जन्मापासूनची जडणघडण त्यांनी ‘घर हिंडते आकाशी’मधून शब्दबद्ध केली आहे.

मुलांमध्ये एखाद्या वस्तूवरून भांडण झाल्यास ते सोडविताना ‘वस्तूपेक्षा माणसं महत्त्वाची असतात,’ असे त्या समजावून सांगतात. अन्य एका प्रसंगात हेच उपदेशामृत चिमुकल्या मुलीकडूनच मिळाल्यानंतर पालकत्वाचा मोठा धडा मिळाल्याचे लेखिका सांगते. शनिवारवाड्यात पडलेला कचरा मुलांनी उचलून पेटीत टाकणे, साठविलेल्या पैशातून मामाच्या वाढदिवसाला छानशी भेटवस्तू आणणे, पिगी बँकेत पैसे साठल्यानंतर खेळ घेण्याचे आणण्याचे स्वप्न असते; पण ड्रायव्हर काका संकटात असल्याचे पाहून ते सर्व पैसे त्यांना मदत म्हणून देणारी समंजस अनन्या, मुलांच्या प्रत्येक अगदी अवघड वाटणाऱ्या प्रश्नाला उत्तरे देण्याचा लेखिकेचा प्रयत्न, अशा अनेक प्रसंगातून लेखिकेने मुलांवर केलेले संस्कार, त्यांचे मुलांकडून होणारे पालन व मुलांचे सामाजिक भान यातून दिसून येते.  

पुस्तक : घार हिंडते आकाशी
लेखक : शेफाली वैद्य
प्रकाशक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन
पाने : १४८
किंमत : १७० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZJMBX
Similar Posts
‘सकारात्मकतेकडे पाहायला हवे’ ‘माध्यमं आणि सोशल मीडियात नकारात्मकतेचं प्रमाण अधिक असलं, तरी आपल्याला भेटणारी बहुतांश माणसं आणि येणारे अनेक अनुभव सकारात्मकच असतात. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपण त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं,’ असं सुप्रसिद्ध पत्रकार, लेखिका, प्रवासवर्णनकार आणि स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांना वाटतं
भारतीय वस्त्र परंपरा - शेफाली वैद्य यांचे व्याख्यान (व्हिडिओ) भारतीय वस्त्रपरंपरेला काही हजार वर्षांची परंपरा आहे. अलीकडेच झालेल्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरूनही हे स्पष्ट झाले आहे, की कापूस लागवड करून त्यापासून वस्त्र तयार करण्याची कला भारतीयांना किमान साडेतीन हजार वर्षांपूर्वीपासून अवगत होती. नवरात्रीनिमित्ताने राष्ट्रीय युवक विचार मंचाने आयोजित केलेल्या
हृषीकेश मुखर्जी आनंद, गुड्डी, चुपके चुपके, अभिमान असे चित्रपट आठवले की हृषीकेश मुखर्जी यांचे नाव येते. हृषीदांचे चित्रपट व त्याचे रसग्रहण असे स्वरूप असलेले ‘हृषीकेश मुखर्जी’ हे पुस्तक जय अर्जुन सिंग यांनी लिहिले आहे.
आपले सण आणि आयुर्वेद + साधे उपाय सोपे उपाय काही आजार साध्या, सोप्या उपायांनाही ते आटोक्यात आणता येऊ शकतात, पण हे उपाय म्हणजेच उपचार कोणते, याची माहिती तज्ज्ञाकडून घेणे हितावह असते. वैद्य य. गो. जोशी यांचे हे पुस्तक अशा उपचारांसाठी मार्गदर्शन करते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language